tag:blogger.com,1999:blog-23163957.post3790365621653697524..comments2023-05-18T19:49:42.404+05:30Comments on शमा - ए - महफ़िल: काल 'त्या' होत्या म्हणून आज आपण आहोत..शर्मिलाhttp://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-23163957.post-7370300789589631492010-03-09T11:23:13.887+05:302010-03-09T11:23:13.887+05:30वैयक्तिकरित्या या सा-यांनी आपल्यासाठी काय केलं, आत...वैयक्तिकरित्या या सा-यांनी आपल्यासाठी काय केलं, आत्ताच्या माझ्या जडणघडणीत या सर्वांचं काय योगदान, मी सेल्फ़मेड आहे वगैरे.. असा मूर्खासारखा विचार कोणतीही स्त्री नक्कीच करणार नाही. रक्तातून वाहणा-या गुणसूत्रांचे व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीत जे योगदान असते अगदी तसेच यांचे योगदान आज मला एक व्यक्ती म्हणून समाजात स्वतंत्रपणे, सन्मानाने जगताना लाभते. माझ्या आजच्या जगण्याला काळाकडून, या व्यक्तिंच्या कार्यातून मिळालेला पाठिंबा, सपोर्ट महत्वाचा आहे.शर्मिलाhttps://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-23163957.post-55672458386150772010-03-09T10:54:11.857+05:302010-03-09T10:54:11.857+05:30ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली स्वत: छापून प्रसिद्ध...ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली स्वत: छापून प्रसिद्ध केलेल्या ’स्त्री पुरुष तुलना’ नावाच्या पुस्तकातले त्यांचे पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्थेवरचे आणि जातीसंस्थेच्या विरोधातले विचार आजही थक्क करुन सोडतील इतके जहाल आहेत. हे पहिले ’मॉडर्न फ़ेमिनिस्ट टेक्स्ट’ म्हणावे लागेल. हिंदू कर्मठ, धार्मिक, ब्राह्मणी पोथी पुराणांतील विचारांना तिने थेट आव्हानच दिले होते. फ़ुलेंची सत्यशोधक समाजाची परंपरा तिने खंबिरपणे निभावली. <br />जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना यांनी राज्य उभारणे, ते सांभाळणे, राजकिय स्ट्रॅटेजीज आखणे यात त्याकाळात (पुरुषी वर्चस्वाला आव्हान देत)जे काम केले आहे ते तर पुरुषालाही लाजवणारे. कोणत्याही स्त्रीला त्यापासून फ़क्त स्फ़ुर्तीच मिळावी.<br />संसदेमधे स्थान मिळवणा-या विजयालक्ष्मी पंडित पहिल्या भारतीय महिला. यूएन ह्यूमन राईट्स कमिशन्मधे भारतातर्फ़े प्रतिनिधित्व करणा-या त्या पहिल्या (नुसत्या महिला नव्हे तर पहिल्या भारतीय). सरोजिनी नायडू इन्डियन नॅशनल कॉन्ग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा, आणि राज्याच्या गर्व्हनरपदी येणा-या पहिल्या महिला. सरोजिनी साहू, कुसुम अन्सल काही पहिल्या इन्डियन फ़ेमिनिस्ट रायटर पैकी एक. (एक और पंचवटी सारख्या) अप्रतिम स्त्रीवादी कथा त्यांनी लिहिल्या. पंजाबीतून लिखाण करणा-या अमृता प्रीतमना तर त्यांच्या खुल्या, निर्भय, संवेदनशील स्त्रीवादी विचार आणि आचारांसाठी आदर्श प्रत्येक भारतीय स्त्रीने आदर्श बनवावे. साहित्य अकादमी पुरस्कार (आणि नंतर ज्ञानपीठ) मिळवणा-या त्या पहिला स्त्रीलेखिका. मधू किश्वरच्या ’मानुषी’चे कार्य जरी घेतले तरी त्यांच्या इतर कर्तृत्वाची दखल नाही घेतली तरी चालेल. <br />आपला वैयक्तिक परिघ सोडून कला, सामाजिक, राजकिय क्षेत्रात काम केलेली प्रत्येक स्त्री, सोशल रिफ़ॉर्ममधे सहभागी झालेला प्रत्येक पुरुष खरतर कोणत्या ना कोणत्या स्वरुपात स्त्रीवादी चळवळीला जोडला जातो. त्याचा इथे सन्मानाने उल्लेख करायलाच हवा.लेख पसरट होईल वगैरे कारणे देत तसे करणे टाळ्णे हा माझा कर्मदरिद्रीपणा होता.शर्मिलाhttps://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-23163957.post-33667898342055003342010-03-09T10:53:59.755+05:302010-03-09T10:53:59.755+05:30भारतीय स्त्रीवादी चळवळींचा प्रसार कसा होत गेला, त्...भारतीय स्त्रीवादी चळवळींचा प्रसार कसा होत गेला, त्यातले टप्पे कोणते, या उल्लेख केलेल्या व्यक्तींचा त्यातला नेमका रोल कोणता हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. युज्वली या व्यक्तींच्या कार्याबद्दल शाळांमधून काही ना काही स्वरुपात माहित हे झालेले असतेच उदा. रॉय यांनी सतीच्या चाली विरुद्ध केलेले काम. <br />फुले, कर्वे यांनी महाराष्ट्रात जे केले तेच ब्राह्मो समाजाच्या कार्यकर्त्यांनी, विद्यासागर, सेन, रॊय यांनी बंगालमधे केले. महाराष्ट्र तरी त्यामानाने प्रोग्रेसिव्हच म्हणायचा इतकी वाईट परिस्थिती बंगालमधे होती. ब्राह्मो समाजाच्या कार्यकर्त्यांना तथाकथीत कुलिन बंगाली ठाकूर घराण्यातील स्त्रियांवर लादले गेलेले कर्मठ रितीरिवाज, प्युबर्टी येण्यच्या आतच केले जाणारे बालविवाह, बहुपत्नीत्वाची चाल, विधवांचे भयानक जिणे यासर्वासाठी काम करणे प्रचंड कठिण गेले. विधवा लहान मुलींवर घरातूनच इतके अत्याचार होत की अर्धपोटी, कृश, हाडांचा सापळा झालेल्या मुली बाहेर पळून जात आणि मग त्यांना वेश्याव्यवसायात ओढणे समाजा्च्या दृष्टीने सोयीस्करच आणि सोपे होते.(१८५३ साली कलकत्त्यामधे वेश्यांची संख्या तब्बल १२,७१८ होती आणि त्यातल्या बहुतेक सगळ्या या अशा मुली होत्या ) यापेक्षा सती जाणे परवडले हा विचार यातूनच आला. <br />विद्यासागरांच्या प्रयत्नांनी विडो रिमॅरेज ऍक्ट १८५६ साली पहिल्यांदा मान्य केला गेला. <br />बंगालच्या रेनेसान्स कालखंडात स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करणारे, त्यांना कायद्याचे पाठबळ मिळावे म्हणून प्रयत्न करणारे हे सारे कार्यकर्ते सोशल रिफ़ॉर्ममधे फ़ार मोठी भुमिका बजावून आहेत. <br />चन्द्रमुखी बासू- कलकत्ता युनिव्हर्सिटीमधून MA (१८८४)झालेली ही पहिली आणि एकमेव महिला. कदंबिनी गांगुली आणि चन्द्रमुखी बासू या दोघींनी त्याआधी १८८० साली देहराडून स्कूलमधून आर्ट्सची पदवी घेतली.महिलांमधे पहिल्यांदा. कोणत्याही हिन्दू मुलीला यासाठी आधी प्रवेश देण्यात आलेला नव्हता.चन्द्रमुखी त्यानंतर त्याच शाळेची मुख्याध्यापिका झाली. संपूर्ण आशिया खंडात त्याआधी कोणीही महिला ऍकेडेमिक हेड झालेली नव्हती. कदंबिनी गांगुली पहिली भारतीय महिला फिजिशियन जिने मेडिकल प्रॅक्टिस केली. <br />आगरकरांचे ’सुधारक’ हे बिरुद बालविवा्हाला,विधवा केशवपनाला विरोध करण्यातूनच आले. रानडेंनी विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, स्त्रियांवर लादलेल्या कर्मठ चालिरिती मोडून काढण्यासाठी मोठी जननागृती आणि काम केले. <br />मॅडम कामांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कर्तृत्वाबद्दल तर लिहावे तितके थोडे. लक्षात घ्या हा एकोणिसाव्या शतकाचा मध्याचा काळ जेव्हा स्त्रिया फ़ारशा घराबाहेरही पडत नसत. <br />सुचेता कृपलानी (मजुमदार)- फ़्रिडम फ़ायटर तर होत्याच पण राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवडून येणारी ती पहिला महिला.<br />चित्तगांवला जन्मलेल्या प्रितीलता वाडदेकरने युरोपियन क्लबमधे जिथे भारतीयांना आणि कुत्र्यांना प्रवेश नसे तिथे प्रवेश करुन स्फ़ोट घडवून आणला होता. प्रचंड डेअरिंगबाज मुलगी होती ही. जेन्डर डिस्क्रिमिनेशला प्रत्येक पातळीवर भारतात जाणीवपूर्वक विरोध करणारी ही पहिली महिला. <br />continued..शर्मिलाhttps://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-23163957.post-5483466096202419462010-03-09T03:02:29.988+05:302010-03-09T03:02:29.988+05:30Wait a minute. What exactly did these people do fo...Wait a minute. What exactly did these people do for you to be wherever you are?<br /><br />"जिजाबाई,राणी लक्ष्मीबाई,राजा राममोहन रॉय, ईश्वरचद्र विद्यासागर, केशवचन्द्र सेन, म.ज्योतिबा फुले, चन्द्रमुखी बासू, कंदबिनी गांगुली, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर, महादेव गोविंद रानडे, भिकाजी कामा,धोंडो केशव कर्वे, सुचेता कृपलानी, प्रितीलता वाडदेकर, ताराबाई शिंदे, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, अमृता प्रीतम, इंदिरा गांधी, सरोजिनी साहू, कुसूम अंसल, किरण बेदी, मेधा पाटकर, मधू किश्वर..."<br /><br />I know a bit about Phules and Karve - that they worked on the widow re-marriage and stuff, but I am havinng a hard time undertanding the role of others in shaping you!<br /><br />The post in not an opinion, would appreciate some references to the facts mentioned.Abhijit Bathehttps://www.blogger.com/profile/03199643482699813766noreply@blogger.com