Friday, October 08, 2010

चिन्ह

'चिन्ह'साठी मी २००५ साली पहिल्यांदा लिहिलं.चित्रकार अतुल दोडियावर काहीतरी होतं ते.त्याच्या स्टुडिओत जाऊन गप्पा-मुलाखत वगैरे.त्यानंतरची चार वर्षे खूप वेगवेगळ्या चित्रकारांवर चिन्हसाठी लिहिलं.कला आणि जाणीवांच्या संदर्भात प्रत्येकवेळी जास्त जास्त समृद्ध होत गेले.गेल्या वर्षी लिहिलेल्या'राजा रविवर्मा आणि त्याने चितारलेल्या त्या सगळ्या देखण्या,दैवी चेहर्‍यांमागचा चेहरा शोधण्याच्या अनुभवांवरचा,रविवर्माच्या मळवलीच्या आता तर पूर्ण जमिनदोस्त झालेल्या पण शतकभरापूर्वी वैभवाच्या शिखरावर असणार्‍या रविवर्मा प्रेसच्या दुर्दशेवरचा लेख मात्र खर्‍या अर्थाने अंतर्मुख करुन गेला.खूप काही देऊन गेला आणि घेउनही गेला.त्या अनुभवांवरही बरंच काही लिहिण्यासारखे आहे..'चिन्ह'वरच खरं तर इतकं काही लिहिण्यासारखं आहे!
'राजा रविवर्मा-एक शोधयात्रा'साठी दोन वर्षे जीवापाड मेहनत केली होती.विनायक परबने'चिन्ह'वार्षिकातल्या माझ्या या लेखावर भरभरुन लेख लिहिला तेव्हा केलेल्या मेहनतीची दखल आणि कलाक्षेत्रातल्या अचूक डॉक्युमेन्टेशनचे महत्व अजून कुणालातरी पटतय याची जाणीव मनाला खूप उमेद देऊन गेली.

राजा रविवर्मा - एक शोधयात्रा
"एक महत्त्वाची दंतकथा महाराष्ट्राने वर्षांनुवर्षे जपली, ती म्हणजे रविवर्माच्या चित्रातील महाराष्ट्रीय तरुणीच्या चेहऱ्याचे रहस्य. महाराष्ट्रातील अनेक पिढय़ांनी वर्षांनुवर्षे ही दंतकथा पुढल्या पिढीला सांगितली, जपली आणि पुढे नेली. त्याला यशस्वी व महत्त्वपूर्ण छेद देण्याचे काम यंदाच्या चिन्ह वार्षिकाने केले आहे. यातील ‘वह कौन थी?’ हा शर्मिला फडके यांचा लेख म्हणजे शोध पत्रकारितेचा उत्तम नुमनाच ठरवा. महाराष्ट्रामध्ये शोध पत्रकारिता होत असते. पण बव्हंशी ती राजकारणाशीच संबंधित असते. त्यातही ‘भांडाफोड’ हाच त्याचा उद्देश असतो. कधीकधी समाजकारणाशी संबंधित कुपोषणादी विषयही हाताळले जातात. पण अशाप्रकारे दृश्यकलेच्या संदर्भात केलेली शोधपत्रकारिता ही मात्र विरळाच. दृश्यकलेशी संबंधित सर्वांनी तर हा लेख वाचायलाच हवा. पण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही तो अवश्य वाचावा, म्हणजे एखाद्या शोधयात्रेमध्ये किती प्रकारे मेहनत घ्यावी लागते, किती व कशाप्रकारचा संयम ठेवावा लागतो याची त्यांनी नेमकी कल्पना येईल."... पुढे वाचा...

1 comment:

हेरंब said...

ग्रेट ग्रेट... सहीच !!!! मनःपूर्वक अभिनंदन !!!!